"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

आपला राष्ट्रध्वज

    ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
 ■ ध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी ■

(१) ध्वजाचा चुकीचा वापर कोठेही करू नये.

(२) ध्वज चुरगळलेला, फाटलेला, मलीन असता कामा नये.

(३) कोणत्याही व्यक्तीच्या मानवंदनेसाठी ध्वज खाली उतरवू नये.

(४) ध्वज ज्या काठीवर लावला असेल त्याच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत.

(५) तोरण,गुच्छ,पताका म्हणून ध्वजाचा वापर करू नये.

(६) इतर रंगीत तुकडे ध्वजासारखे दिसतील असे जोडू नयेत.

(७)व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी ध्वज वापरू नये.

(८) ध्वजावरील केसरी रंगाचा पट्टा नेहमीच वरच्या भागात असावा.

(९) ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये.

(१०)ध्वज फाटेल या रीतीने तो फडकवू नये. वा बांधू नये.

(११) ध्वज फाटला वा मळला तर तो कोठेही फेकून देऊ नये अथवा त्याचा अपमान होईल अशा रीतीने त्याला नष्ट करू नये.

(१२)ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत.

(१३) काही उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूशिवाय इतर कोणत्याही प्रसंगी ध्वज अर्ध्यावर उतरवू नये.

(१४)ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे विधिपूर्वक उतरविण्यात यावा.

(१५) हवामान कसेही असले तरीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल.

      आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा मानदंड आहे. आपल्या संस्कृतीचे, उज्ज्वल यशाचे,परंपरांचे ते प्रतीक आहे. त्याचा यथोचित आदर राखणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. 
●~~●~~~~●●~~~~●~~●


   


●~~●~~~~●●~~~~●~~●

No comments:

Post a Comment